मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मास्क सक्ती पुन्हा करावी, अशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून मागणी करण्यात येत आहे. देशात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही याबाबत विचार केला जातोय का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. पुन्हा मास्क सक्ती केल्यास त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रिया उमटेल. म्हणून रुग्णसंख्येचा विचार करून मास्क बाबत विचार केला जाईल. अशी माहिती समोर आली आहे. राज्यात सध्या तरी मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय झाला नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तर लसीकरण वाढविण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
दरम्यान आरोग्य तज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली असून राज्यात सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने भीतीचे कोणतेही कारण नाही. मात्र राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा…”, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना जोरदार टोला
- “बच्चा, बच्चा है बाप ‘बाप’ है” ; नवनीत राणांनी मोदींवर केली होती टीका, VIDEO व्हायरल
- “पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “…या विषयांवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देताय”, राऊतांचे टीकास्त्र
- IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

