Share

‘या’ कारणामुळे खासदार गिरीश बापट यांनी लिहले पंतप्रधान मोदींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

पुणे : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्याची वाढ वेगाने वाढत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

त्यामुळे यावर अटकाव आणण्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी सरकारकडून देखील योग्य ते उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांमध्ये वाढ होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.

यातच राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाची परिस्थिती भयाण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्याचबरोबर ३० वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे, असेही या पत्रात सांगण्यात आले आहे. पुण्यातील शिवाजीनगर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हे पत्र ट्वीट केलेले आहे.

गिरीश बापट यांनी पुण्याची कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता कोरोना लसीकरणाची केलेली मागणी हि योग्य असून यावर आता काय निर्णय दिला जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!