🕒 1 min read
चिपळूण : चिपळूण मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची भेट घेतली. तेथे त्यांनी व्यापाऱ्याच्या व्य़था समजून घेतल्या. दरम्यान यापुर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली. तेथे त्यांनी दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तींना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
तसेच त्यांनी केंद्राकडून पूर्णतः मदत होईल, असे आश्वासन दिले. कोणतेही राजकारण केले जाणार नाही, अशे आश्वासन दिले. तसेच येथील परिस्थिती पाहून मलाही दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यानन, त्यांनी पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत सत्ताधारी आमदार, खासदारांनीच दांडी मारली. पूरस्थितीवर सर्व पक्ष दुखाव्याक्त करता आहे. तसेच मदत सुद्धा करत आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी पाहणी करून पूरग्रस्तांना मदत मिळण्याचे आश्वासन दिले आहे.
चिपळूण येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिपळूण शहरात व्यापारी तसेच नागरिकांशी संवाद साधला. भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. pic.twitter.com/tOytDHxxGz
— Governor of Maharashtra (@maha_governor) July 27, 2021
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल आणि सरकार यांच्यातील वाद समोर येत आहे. राज्यपाल प्रतिसरकार चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही हाेत आहे. राज्यपालांच्या पूरस्थिती पाहणी दौऱ्यावरही सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यात आता मदत देण्याच्या बाबतीत राजकारण होणार नसल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं पंतप्रधान मोदींना जमलं मात्र मित्र पक्षाच्या राहुल गांधींना का नाही जमलं ?
- ममता बॅनर्जी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल
- ‘छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती’ ; फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणे शहराच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तर कोरोनामुक्तांची संख्या देखील अधिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
