🕒 1 min read
पुणे : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील अंतिम दोन सामन्यातील पंचाच्या वादग्रस्त निर्णयामुळे चांगलेच वादंग निर्माण झाले होते. याबाबतीत आतापर्यंत काहीही वक्तव्य न करणारा कर्णधार कोहलीने आपले मौन सोडत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकदिवसीय मालिकेपुर्वी त्याने ही नाराजी बोलुन दाखवली.
कोहली म्हणाला की, ‘सामन्यात पंचानी घेतलेले निर्णय हे मनामध्ये संभ्रम निर्माण करणारे होते. यात विशेषकरुन सॉफ्ट सिग्नलच्या निर्णयामुळे संभ्रम निर्माण झालेला पहायला मिळाला. जर या प्रकारच्या चुका पंचाकडून होत राहील्या तर त्याचा किती मोठा फटका बसु शकतो हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे या निर्णयाबद्दल विचार केला जावा असे मी म्हणेल.’ असे कोहली म्हणला.
‘सध्याच्या घडीला पायचीताचा निर्णय देताना चेंडु यष्टींना किती लागतो हे पाहले जाते. जर चेंडु ५० टक्क्यापेक्षा जास्त लागला असेल तर फलंदाज बाद दिला जातो. त्यापेक्षा कमी लागला असेल तर नाबाद दिले जाते. जर चेंडु यष्टीला लागला असेल तर त्याला बादच दिले पाहिजे. मग तो कितीही टक्के लागली तरी बाद दिले पाहिजे.’ असे कर्णधार कोहली यावेळी म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे
- ए भाई , तू जो कोण असशील… माझ्यावर बोट उचलायचं न्हाय – अमृता फडणवीस
- “रोहित शर्माचा नाद नाही करायचा तो टी-२० मध्ये सुद्धा द्विशतक ठोकू शकतो”
- मालिका गमावण्याचा असाही फायदा.. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचे मोठे वक्तव्य
- भारतीय संघासाठी वाईट बातमी?…कर्णधार कोहली होऊ शकतो संघाबाहेर


