मुंबई : आज आयपीएलमध्ये मुंबईत वानखेडे मैदानावर गुणतालीकेत सर्वात खाली असलेले दोन संघ भिडणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे पुनरागमनाच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. दोन्ही संघानी आतापर्यंत ४ सामने खेळले असुन केवळ एका सामन्यात विजय प्राप्त केला तर तीन सामन्यात पराभव स्विकारला आहे.
राजस्थान संघाने आपला पहिला सामना पंजाब विरुद्ध गमावला. मात्र त्या सामन्यातील कामगिरी बघुन राजस्थान इतर संघाला चांगली टक्कर देईल असे वाटले. मात्र दिल्ली कॅपीटल्स विरुद्ध विजय वगळता. इतर दोन सामन्यात राजस्थान संघाने ज्या प्रकारे पराभव स्विकारला त्यामुळे संघाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. कर्णधार संजुची बॅट सलामीच्या सामन्यानंतर शांत आहे. गोलंदाजीत कोणीही विशेष कामगीरी करु शकला नाही. मुख्य: राजस्थानच्या संघाची फंलदाजी ही केवळ डेव्हिड मिलर आणि जोस बटलर यांच्यावर अवलंबुन आहे.
तर दुसरीकडे केकेआरने जरी तीन सामने गमावले असले तरी त्यांची कामगीरी समिंश्र राहिली आहे. त्यात मुंबई विरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर चेन्नई विरुद्ध पराभवातही त्यांनी ज्याप्रकारे लढा दिला. त्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. केकेआरसाठी कर्णधार मॉर्गनचा फॉर्म चिंतेची बाब ठरत आहे. तर सलामीवीर मोठी भागिदारी करण्यात अपयशी ठरल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजावर दबाव येत आहे. गोलंदाजीत केकेआरची कामगीरी साधारण राहीली आहे. तेव्हा आजच्या सामन्यात कोणता संघ पुनरागमन करेल याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- बुमराहने तपासली मॅचवीनर के एल राहुलची बॅट; फोटो व्हायरल
- खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पाठपुराव्यानंतर बीड जिल्हयातील ७३ कोटी रुपयांच्या रस्ते कामांना मंजूरी
- पंढरपूरला आणखी दोनशे बेड वाढवणार; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय
- कायदा मोडून रस्त्यावर येणाऱ्यांची गय करू नका, बाळासाहेब थोरातांच्या प्रशासनाला सुचना
- ‘गडबड’ केली म्हणून सीबीआय आली, आता ‘बडबड’ न करता न्यायालयाचा आदेश वाचा – चित्रा वाघ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

