🕒 1 min read
नागपूर : कळमेश्वर तालुक्यात खरीप हंगामामध्ये शेतकरी कपाशी व सोयाबीन पिकाला प्राधान्य देतात. मृग नक्षत्रात सोयाबीन पिकाला प्राधान्य देतात. शेतकर्यांनी मृग नक्षत्रात सोयाबीनची पेरणी केली. सुरवातीच्या काळात पावसाची योग्य साथ मिळाल्यामुळे पिके डोलू लागली. ऑगस्ट महिन्यात पडलेल्या संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादरुभाव झाल्यामुळे पीक पिवळे पडून खराब झाले. कृषी विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणामध्ये कळमेश्वर तालुक्यात २२00 हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात तालुक्यातील सोयाबीनचे पीक जोमात होते. परंतु कलधारणा व शेंगा पक्क होण्याच्या काळा त संततधार पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव, ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादरुभाव होऊन पिक पिवळे पडून खराब झाले.
चालू खरीप हंगामामध्ये तालुक्यात २१३२७ हेक्टर कपाशीची लागवड करण्यात करण्यात आली तर ३२00 हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. कृषी विभाग महसूल विभाग पंचायत समिती यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणाअंती तालुक्यामध्ये २२00 हेक्टर सोयाबीन पिकाला फटका बसला आहे.
सोयाबीन पाक नुकसानीचा अहवाल तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी नागपूर यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी जगदीश नेरलवार यांनी दिली.कमी काळाचे व नगदी पीक म्हणून शेतकर्यांनी उसनवारी तसेच सावकाराकडू कर्ज घेऊन शेतात सोयाबीनची पेरणी केली.
होणार्या उत्पादनातून कर्जाची परतफेड कुटुंबाचा उदरनिर्वाहासह दिवाळी सण साजरा करण्याचा मानस होता. परंतु अतवृष्टीमुळे सोयाबीन पीक खराब झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेले नुकसान पाहता शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- राष्ट्रवादी काँग्रेस देणार भाजपला मोठा धक्का? ‘या’ बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा!
- कोरोना बाधित रुग्णांना मिळेना रेमडीसीवीर इंजेक्शन, आ.जगताप यांचे आरोग्यमंत्री टोपे यांना साकडे
- फडणवीसची एम्स आणि मेयो रुग्णालयाला भेट
- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना कोरोनाची लागण
- नाथाभाऊंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊच देणार नाही – सुधीर मुनगंटीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
