🕒 1 min read
बीड : राज्यात सर्वत्र सध्या खरीप हंगामातील पिके परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून अनेक ठिकाणी पूर आल्याने शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे आधी कोरोनामुळे करण्यात आलेली ताळेबंदी आणि त्यानंतर जून महिन्यात पावसानं शेतकर्यांना दिलासा दिला खरा मात्र आता याच आतिवृष्टीने जोमत आलेल्या खरीप पिके अक्षरशः पावसात वाहून गेली आहेत.
त्यामुळे खरीप पिकांच्या भारवशावर असलेला शेतकरी मात्र पुरता खचून गेला आहे. या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान झाले असून विदर्भात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपीक, तर कोकणात भाताचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकससणीची त्तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर सरकार कडून अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरु आहे. यावेळी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे असे सांगत पिडीत शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित ‘धनादेश’ देऊन ठाकरेंनी दाखवली तत्परता
- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘अर्णब गोस्वामी’ची उच्च न्यायालयात धाव
- सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केंद्राने आतापर्यंत राज्यांना 1352 कोटी रुपये केले जारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
