🕒 1 min read
मुंबई : टीआरपी स्कॅम समोर आला आणि मनोरंजन क्षेत्रासह लोकशाहीचा चौथा स्थंभ समजल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले. फक्त मराठी, अर्णब गोस्वामींचे रिपब्लिक चॅनलसह अन्य एका वाहिनीवर टीआरपीमध्ये घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यादरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या ‘पूछता है भारत’ या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न देखील मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला होता.
तर, टीआरपी घोटाळाप्रकरणी अडकलेले ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून, घोटाळाप्रकरणी दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यात यावा अशी मागणी करत रिपब्लिक टीव्हीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- कोश्यारींना स्वाभिमान असेल तर त्यांनी पदावर राहायचं की नाही हे ठरवावं ; पवारांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
