Share

नुकसान भरपाईसाठी जालन्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, बैलगाडी, ट्रॅक्टरसह काढला मोर्चा

Published On: 

🕒 1 min read

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी इथल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्य सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. पंचनामे न करता सरसकट मदत घोषीत करावी, अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बैलगाडी, ट्रॅक्टर यांचाही या मोर्चामध्ये सहभाग होता.

युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी या मोर्चामध्य सहभागी झाला नव्हता. शेतकऱ्यांना हेक्टर ५० हजार रुपयांची तर फळबागेला एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिक पूर्णपणे हातातून गेले आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी जमीन खरडून गेल्याने याचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. यामुळे सरकारने जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!