औरंगाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र आता शासनाकडून अनुदान मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते वाटप करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यात दोन दिवसांत ३७ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५३ लाख ४९ हजार ४६२ रुपये जमा झाले. अजूनही ६ लाख ६६ हजार ९०० शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया व पूर्ण होईल. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी यंदा गोड जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान ७ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ५२४६५५.७१ हेक्टरातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यात शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम देखील हातून गेल्याने दुहेरी नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे. शासनाने पीक नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप केले जाईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारपासून अनुदान वाटप सुरू झाले आहे.
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील ३७ हजार शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. तर अजूनही जिल्ह्यातील ६ लाख ६६ हजार ९०० शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणे शिल्लक आहे. दरम्यान आजपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असून शंभर टक्के अनुदान वाटपाची प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहे. वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव या ३ तालुक्यांतच पीक नुकसानीचे अनुदान वाटप सुरू झाले आहे. तर सहा तालुक्यांतील ७ तहसील कार्यालयांमध्ये अद्याप अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरूच झालेली नाही. यात अप्पर औरंगाबाद तहसील, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद या तहसील कार्यालयांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील’, असदुद्दीन ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य
- हॅलोविन लूकने’अप्सरा’ सोनालीने चाहत्यांना केले घायाळ..
- इंधन दरवाढीचे सत्र सुरूच! लवकरच पेट्रोल १२० रुपयांचा टप्पा गाठणार
- यहॉं तो पुरी सरकारही काँच से बनी है; पडळकरांचे राज्य सरकारवर ताशेरे
- ‘…त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

