Share

गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली मदत शेतकरी पंतप्रधानांना परत करणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली तोकडी मदत राज्यपाल व पंतप्रधानांना प्रत्येक शेतकरी परत पाठविणार आहे. प्रति एकर 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्या. पिकविमा न मिळण्याच्या विरोधात 25 नोव्हेंबरपासून किसान सभा राज्य़भर आंदोलन करणार असल्याचा इशारा अजित नवले यांनी दिला आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1196680459406598144?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1196677029149597696?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1196675297430495232?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!