Share

आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीने दिला स्वबळाचा नारा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागे बिहार निवडणुकांचे कारण असल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे बिहार निवडणुकांमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून रोखणार का? यावर राजकीय क्षेत्राची नजर होती.

मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल  यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष आता वेगवेगळे लढणार आहेत.

शिवसेनेने आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. बिहार शिवसेनेच्या नेत्यांनी किमान ५० जागा पक्षातर्फे लढवण्यात याव्या या मागणीसाठी मुंबई गाठली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला, दोन्ही पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने २२ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवेसेना नेते संजय राऊत प्रचार करतील, असे सांगण्यात येत आहे.

शिवसेना स्थानिक पक्षांच्या संपर्कात!

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. बिहार निवडणूकीत कुणासोबत युती करायची याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर ‘बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे मी पुढच्या आठवड्यात पाटन्याला जाणार आहे. त्यावेळी यावर चर्चा होईल’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!