इंग्लंड : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे सुरु असलेला चौथा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य मिळाले. खेळाच्या चौथ्या दिवशी, इंग्लंड संघाने त्यांच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या सर्वोत्तम सुरुवातीच्या आधारावर कोणतेही नुकसान न करता 77 धावा केल्या होत्या.
आजचा म्हणजेच पाचवा दिवस दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार असून क्रिकेट रसिकांचे लक्ष सुरु असलेल्या सामन्याकडे लागले आहे. आजच्या दिवसाचे पहिले दोन सत्र संपले असून आता निर्णायक तिसरे सत्र उरले आहे. आजचे दोन्ही सत्र हे भारतासाठी चांगले ठरले असून गोलंदाजांनी महत्वाची जबाबदारी बजावली आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्राअखेर इंग्लंड ८ बाद १९३ धावांवर असून जवळपास फलंदाज हे बाद झाले आहेत. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त २ बळी हवे आहेत.
इंग्लंडला विजयासाठी १७५ धावांची गरज असून ते आता सामना अनिर्णित राखण्यासाठी प्रयत्न करतील. महत्वाचं म्हणजे भारतासमोर कडवं आव्हान उभं करणारा जो रूट हा बाद झाला आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले आहेत. तर, उमेश यादव याने १ बळी घेतला आहे. हा सामना जिंकल्यास भारत मालिका विजयाच्या आणखी जवळ जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- चौथा कसोटी सामना कोणाच्या पारड्यात ? भारत विजयापासून केवळ ४ बळी दूर
- बूम बूम बुमराह…कसोटीत १०० बळींचा टप्पा अवघ्या २४ सामन्यात गाठून रचला खास विक्रम
- संजय राऊतांना बहुतेक अल्झायमर झालाय, आता ते पोलीसच बघतील – चंद्रकांत पाटील
- भल्याभल्यांना चकवा देणारे रावसाहेब दानवे जेव्हा सारीपाट खेळतात!
- ‘पूरग्रस्त शेतकरी, बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार’; मुख्यमंत्र्यांचा शब्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
