🕒 1 min read
मुंबई: राज्यातील ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होणार आहेत हा OBC समाजावरील अन्याय आहे. OBC आरक्षणासंदर्भात बांठिया समितीचा अहवाल तयार आहे, त्यामुळे आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.
तसेच या निर्णयावर राष्ट्रवादीनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे म्हणून आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी म्हटले आहे.
राज्यातील ९२ नगर परिषद व ४ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका OBC आरक्षणाशिवाय होणार आहेत हा OBC समाजावरील अन्याय आहे. OBC आरक्षणासंदर्भात बांठिया समितीचा अहवाल तयार आहे, त्यामुळे आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) July 9, 2022
तसेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पहिल्या दिवसापासून स्वतः यात जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांटिया आयोगाने इम्पिरेकल डेटा गोळा करून अहवालही तयार केला आहे. अशी माहिती जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs ENG : विराट कोहलीला दुसऱ्या टी-२० सामन्यात संघात स्थान नाही; भारताच्या माजी खेळाडूंचं वक्तव्य
- Akshay Kumar : अमरनाथ दुर्घटनेवर अक्षय कुमार भावूक, ट्वीट करत म्हणाला…
- Sanjay Raut : खोकी मिळाली म्हणजे झोप लागतेच असं नाही, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांवर निशाणा
- Sanjay Raut | “शिंदेंची हायकमांड दिल्लीत, धनुष्यबाण हातात ठेवा, कुठे घुसवायचाय हे…” ; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी
- Anand Mahindra : “गरज ही शोधाची जननी असते…”, आनंद महिंद्राचे ‘ते’ ट्विट व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
