धनश्री राऊत : पालक किंवा पालेभाज्या म्हणलं की सहसा लहान मुले नको म्हणतात. मात्र शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे पालकामध्ये असतात. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते.
याचप्रमाणे पालकाच्या भाजीचा रस वजन कमी करण्यास आणि जाडी रोखण्यास उपयोगी पडू शकतो, असे स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून दिसून आले आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते.
तसेच पालकाच्या भाजीच्या रसामुळे वजन वाढविणारे अनारोग्यकारक अन्न पदार्थांविषयी नावड निर्माण होते. त्याचबरोबर या रसामुळे वजन उतरण्याचा वेग वाढतो. स्वीडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ स्वीडन या विद्यापीठात करण्यात आलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
‘पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात. गर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते’.
दरम्यान, लठ्ठ व्यक्तीला सतत काही तरी खावेसे वाटते आणि त्यातल्या त्यात आरोग्याला उपयुक्त नसलेला पण वजन वाढण्यास कारणीभूत ठरणारा आहार घेण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. मात्र रोज पालकाचा रस पिणारी व्यक्ती अनारोग्यकारक अन्न पदार्थ टाळू शकते आणि ९५ टक्के इतकी त्याची ही प्रवृत्ती वाढते. माणसाचे वजन वाढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतल्या आत वजन कमी करण्याची एक प्रक्रिया जारी असते. ती वजन कमी करण्याची प्रक्रिया पालकाच्या रसामुळे ४३ टक्क्याने वाढते.


