🕒 1 min read
भोपाळ : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. या कायद्यांच्या विरोधात कॉंग्रेसने खेती बचाओ यात्रा सुरु केली आहे. कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर झाल्यापासून काँग्रेसने या कायद्यास जोरदार विरोध केला होता. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या विधेयकांना मंजुरी देऊन कायदायत रूपांतर केल्याने काँग्रेसने देशभरात आंदोलन उभारलं आहे.
काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपसह मित्रपक्षांनी टीका केली असून हे विधेयक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असून दलालांना चाप बसवणारे आहे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का पसरवत आहे? राहुल गांधी ट्रॅक्टर सोफा लावून फिरत आहेत. शेतकरी किंवा शेतीबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. एवढंच काय कांदा जमिनीच्या वर उगवतो की खाली, हेदेखील त्यांना ठाऊक नसेल,’ अशी खोचक टीका देखील त्यांनी केली आहे.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या माध्यमातून लहान व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना संपवले. त्याच पद्धतीने शेतकरी आणि मजुरांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी तीन नवे कृषी कायदे बनवले, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :-
- ‘मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे’
- सोलापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; एमआयएम फुटीच्या उंबरठय़ावर
- महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आता भाजपही करणार राज्यभर निदर्शने
- ‘MPSC परीक्षा पुढे ढकलाव्यात,अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहील’
- मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असताना सरकारला एमपीएससी परिक्षा घेण्याची एवढी घाई का आहे?

