Share

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून दिलासा,तब्बल 4,714 कोटींचं पॅकेज जाहीर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रासाठी 4714.28 कोटी तर कर्नाटकसाठी 949.49 कोटी रुपयांची दुष्काळ मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी घोषणा केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या राज्यांसाठी एकूण ७, २१४. ०३ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, या पॅकेजमध्ये आंध्र प्रदेशसाठी ९००.४० कोटी रुपये, उत्तर प्रदेशसाठी १९१.७३ कोटी रुपये, हिमाचल प्रदेशसाठी ३१७.४४ कोटी रुपये, गुजरातसाठी १२७.६० कोटी रुपये आणि कर्नाटकसाठी ९४९.४९ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणाच्या विविध कामांसाठी या निधीची राज्य सरकारला मदत होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी १३.०९ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!