Share

तुम्ही गुजरातमध्ये दंगली घडवल्या, पवार साहेबांनी मुंबईत दंगल शांत केली – मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राच्या मातीत येऊन भाजपच्या अध्यक्षांनी डंका पिटवू नये. आमच्या दैवताबद्दल एकही वाईट शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. ९३ साली जेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शरद पवार यांनी दंगली शांत करण्याची जबाबदारी पेलली. तुम्ही तर गुजरातमध्ये दंगली घडविण्याचे काम केले. असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. लातूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांना गळाला लावत पवारांना धक्का दिला आहे, तर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उरतले आहेत. पवार यांनी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व बीडमध्ये कार्यकर्त्यांना मेळावा घेत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अध्यक्ष अमित शाह यांनी पुरोगामी महाराष्ट्रात येऊन शरद पवारांचा अपमान केला. मी शपथ घेतो की भाजपचे अविचार या पुरोगामी महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहोत. तुमच्या ईडी बिडीची आम्हाला भीती नाही, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.

छत्रपतींच्या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा आहे. आमच्या छत्रपतींचे वंशज दिल्लीत गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी देशाच्या पंतप्रधानांनी यायला हवे होते. मात्र ज्यांची पत नाही त्यांनी छत्रपतींच्या वारसांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजप छत्रपतींची अस्मिता पूसून टाकण्याचं पाप करतंय, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!