Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरात पेटला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे सर्व माहिती ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना सांगणार असल्याचं म्हटलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या संविधानाने कोणालाही कुठल्याही राज्यात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. राहण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणी थांबवू शकत नाही. त्यामुळे जर एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल, तर त्या राज्य सरकारने ते रोखण्याचं काम केलं पाहिजे आणि जर असं लक्षात आलं की राज्य सराकर रोखत नाही, तर निश्चित ते केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, त्यामुळे आतातरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय ते घडतय की नाही हे आम्ही पाहतोय. यासोबत यासंदर्भातील सगळी माहिती ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत मी पोहचवणार आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या घटनांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “शरद पवारांना बेळगावात जायची गरज पडणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
- Rohit Pawar | “यापुढं शांत बसणार नाही”, सीमावादावर रोहित पवार संतापले
- Sushma Andhare | “इलाका तुम्हारा और धमाका हमारा”, सुषमा अंधारे यांचा मनसेवर पलटवार
- Nilesh Rane | “शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; सीमावादावरून निलेश राणेंची सडकून टीका
- Aditya Thackeray | सीमावादावरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले…


