Devendra Fadanvis | मुंबई : सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी नेमण्यात आलेले समितीचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, अचानक दौरा रद्द झाला. त्यामुले राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणा आलं आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत सांगताना, आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सीमावादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. यासंदर्भात कर्नाटक आणि महाराष्ट्र निर्णय घेऊ शकत नाही. राज्याने अत्यंत ताकदीने कोर्टात आपली भूमिका मांडली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच, विनाकराण यासंदर्भात नव्या वाद सुरु करणं चुकीचे आहे. मंत्र्यांच्या हा दौरा महापरिनिर्वाण साठी होता. एका कार्यक्रमाल मंत्री जाणार होते. यासंदर्भात कर्नाटकच काही म्हणणं आहे. महाराष्ट्राच देखीलं म्हणणं आहे, असं देखील फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मात्र, महापरिनिर्वाण दिनी आपण अशा प्रकारचा वाद तयार करयाचा का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून काही ना काही विचार सुरू आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Thackeray-Ambedkar | ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज होणार निर्णय? आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
- Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क
- Chandrashekhar Bawankule | “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- PAK vs ENG | इंग्लंडला मोठा झटका! लियाम लिव्हिंगस्टन पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर
- Vasant More | “तात्या राष्ट्रवादीत कधी येताय, वाट पाहतोय”, मनसे नेते वसंत मोरेंना अजित पवारांकडून ऑफर


