मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलत असतांना त्यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच युतीतली आमची २५ वर्षे सडली, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान, ठाकरेंच्या या वक्तव्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’ठाकरेंच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर बघायला मिळाला. २५ वर्षे युतीत सडलो, असे ते म्हणाले. २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. १९८४ मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते’, अशी आठवणही यावेळी फडणवीसांनी करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
“मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
“…त्यामुळेच पटोलेंना महाराष्ट्राचे पप्पू म्हणून नामाभिमान देण्यात आलाय”
“देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
“राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेसच नाही त्यासाठी संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

