Share

लॉकडाऊन असले तरीही आयपीएल सामने मुंबईतच होणार : सौरभ गांगुली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे.

अशा स्थितीत मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबत चिंता निर्माण झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने  शनिवार व रविवार लॉकडाउन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गांगुली यांनी एका वृत्तसंसथेला माहिती दिली, ‘आम्हाला लॉकडाउनमध्ये कोणतीही अडचण येणार नाही कारण आम्ही सामना आयोजित करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली आहे.

मुंबईच्या वाखेडे स्टेडियमवर आयपीएलचे 10 सामने खेळले जात आहेत आणि हे सर्व सामने 10 ते 25 एप्रिल दरम्यान बायो बबलच्या आत खेळले जातील. असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!