Share

शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदीचे पक्के बिल घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यासह जिल्ह्यातील शेतक-यांना खरिप हंगामातील पिक पेरणीचे वेध लागल्याने शेतक-यांची बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणाऱ्या औजारांची जुळवा जूळव करणे सुरू झाले आहेत. पावसाचे तालुक्यात समाधानकारक चित्र दिसून येत आहे.

 

मात्र, शेतक-यांनी बियाणे खरेदी करतांना खात्री करुनच बियाणे खरेदी करावी. जणेकरुन आपली फसवणूक टाळता येईल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून खरिपाचे नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री भुसे यांनी राज्यातील कृषी विभागाला दिल्या आहेत. यासाठी पोक्राच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर तालुकानिहाय कृषी हवामान सल्ला सेवा सुरू करण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या साहाय्याने ही सेवा देण्यात येणार आहे.

 

असे असतांनासुध्दा खरिपाच्या इतक्या मोठ्या सोहळ्यात बी-बियाणे, खते, किटक नाशक या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल होते. ही संधी साधून अनेकजण याचा आर्थिक फायदा घेण्यासाठी बाजारात बोगस बियाणे विक्री करणारे टपून असतात. कमी दरात बियाणे मिळत आहे म्हणून खरेदी न करता शेतक-यांनी खात्री करुनच बियाणांची खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर संबधीताकडून पक्केबिल घ्यावे, असे आवाहन कृषि विभागाकडून शेतक-यांना करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!