तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना प्रार्दुभाव पार्श्वभूमीवर नुकताच आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी रुपाली येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील सर्किट हाऊस येथे शुक्रवार रोजी बैठक होवुन यात बहुतांशी अधिकारी मंडळीनी कोरोना रोखण्यासाठी तुळजापूर- सोलापूर सीमा बंदी पंधरा दिवस कडकपणे राबविण्याची मागणी केली .
‘आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे’
येथील सर्किट हाऊस मध्ये कोरोना पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यात सविस्तर चर्चा झाली. कोरोना मुक्त असलेला तुळजापूर तालुक्यात कोरोना प्रार्दुभाव वाढण्याचे मुख्य कारण सोलापूर मार्ग आलेली मंडळी असल्याने सोलापूर मार्गे येणाऱ्या मंडळीना प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर जिल्हयाचा सीमे लगत असलेले उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर तालुक्यातीवा रस्ते गावे चोरवाटा येथे पंधरा दिवस कडक संचारबंदी लागू करुन लाँकडाऊन करावे व सोलापूर मार्गाहुन आलेल्या व्यक्ती स सक्तीने क्वारटांईन करावे म्हणजे उस्मानाबाद जिल्हयात तुळजापूर तालुक्यात वाढत चाललेला कोरोना प्रार्दुभाव थांबविण्यास प्रशाषणास यश येईल अन्यथा प्रशाषणाने किती ही उपाययोजना केल्या तरीही कोरोना थोपवणे कठीण जाईल असे मत बहुतांशी प्रशाषणातील प्रमुख मंडळीनी या बैठकीत मांडले .
यावर बोलताना अप्पर जिल्हाधिकारी रुपारी येवले यांनी या प्रकरणी सोलापूर आयुक्तांशी चर्चा करण्यात येईलअसे सांगुन कोरोना चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची सुचना केली . तसेच 30तारखेला लाँकडाऊन उठताच काय दक्षता घ्यावी यावर ही यात चर्चा झाली.प्रामुख्याने कोरोना रोखण्यावर या बैठकीत मोठे मंथन झाले.
रत्नागिरी जिल्ह्यावर मोठे संकट, ‘सारी’च्या साथीने घातले थैमान
या बैठकीस उपविभागीयअधिकारी रामेश्वर शेडगे उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे तहसिलदार सौदागर तांदळे उपजिल्हारुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी चंचला बोडके गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड डाँ. जाधव ,तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ सतिश पवार ,मुख्याधिकारी अशिष लोकरे सह विविध विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थितीत होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

