औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सरासरी गुणांच्या आधारे निकाल देण्यात येणार आहेत. औरंगाबाद विभागातील दहावीच्या निकालाचे ९९.८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर इयत्ता बारावी मूल्यमापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात काही त्रुटी असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या आराखड्यातील त्रुटी दुरुस्त करा. अशी मागणी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने परीक्षा मंडळाकडे केली आहे.
मूल्यमापन आराखड्यात दहावीच्या तीन अधिकतम गुण असलेल्या विषयांची सरासरी काढून परिशिष्ट १.१ मध्ये रकाना क्रमांक ४ मध्ये १०० पैकी गुण भरल्यानंतर रकाना क्रमांक पाचमध्ये ३० टक्के ऐवजी २४ पैकी गुण भरावे असे प्रशिक्षणात सांगितले गेले आहे. परंतु हा सारांश ३० टक्के न येता तो सारांश २४ टक्के नुसार येत आहे.
त्यामुळे मुलांचे गुण कमी येत आहे. असेच अकरावीच्या गुणांची नोंद करतानाही रकाना क्रमांक ६ आणि ७ मध्ये देखील होत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मूल्याकन आराखड्याच्या त्रुटी दुरुस्त कराव्यात अशी मागणी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे मराठवाडा अध्यक्ष युनूस पटेल, जिल्हाध्यक्ष मनोहर सुरगडे पाटील, किरण मास्ट, दिलीप धुमाळ, प्रकाश देशमुखसह आदींच्या वतीने बोर्डाकडे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी मोदींवरच केला हल्लाबोल ! वाचा नेमकं काय आहे प्रकरण
- ‘कायदा सर्वोच्च आहे, त्याचे पालन करावेच लागेल’, नुतन आयटी मंत्री वैष्णव यांनी ट्विटरला झापले
- ‘पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने प्राधान्याने काम सुरु’
- ‘म्हणजे आता लसींचा तुटवडा भासणार नाही का?’, आरोग्यमंत्र्यांच्या बदलानंतर राहुल गांधींचा खोचक सवाल
- वैजापूर तालुक्यात पेरण्या पूर्ण, बळीराजा वरुणराजाच्या प्रतिक्षेत!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

