Share

‘राज्यात कोरोना लाट येतेय म्हणे, लाट यायला समुद्र आहे काय?’, मनसेचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यात कोरोनामुळे शासनाने दहीहंडीवर बंदी घातली होती. मात्र शासनाचे सर्व नियम झुगारून लावत मनसेने मुबई, ठाणेसह नाशिकमध्ये दहीहंडी फोडलीच. या कार्यकर्त्यांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. तिसरी लाट येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटले आहे. यावर राज ठाकरे यांनी लाट यायला समुद्र आहे काय, असा प्रश्न करत ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे. तसेच कुठं काही जाणवतंय का तुम्हाला. उगीच इमारती सील करायच्या, यापूर्वी या देशात कधी रोगराई आलीच नाही का, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना चांगलाच टोला लगावला आहे.

राज्यात सर्व कार्य जोमात सुरु आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येताना दिसतात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. शासनाला जनआशीर्वाद यात्रा चालते. पण सण-उत्सव नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!