Share

आनंदाची बातमी : राज्यात आतापर्यत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

Published On: 

मुंबई : राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९२५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.

सरकार बाहेरच्या कुठल्याही माणसांनी पडत नाही आतलेच लोक पाडतात – सुधीर मुनगंटीवर

राज्यात नोंद झालेले २५७ मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९,कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे- १, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४,सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१,नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

सिंधिया यांचा फोटो पोस्ट करत कॉंग्रेस नेत्याने दिल्या नागपंचमीच्या शुभेच्छा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!