🕒 1 min read
मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 50 हजारच्या घरात पोहचली आहे. तर आज दिवसभरात नव्याने 3041 जणांची भर पडली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33988 एवढी आहे, असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, रविवारी 3041 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 50 हजार 231 इतकी झाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात 1196 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 व्यक्ती करोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33988 इतकी आहे.
राज्यात आज 3041 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 50231 अशी झाली आहे. आज नवीन 1196 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 14600 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 33988 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 24, 2020
दरम्यान राज्यात मुंबईमध्ये कोरोनाबधितांची संख्या सर्वाधिक आहे. तर धारावीत दिवसभरात 27 नवीन रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. धारावीतील एकून करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1541 झाली आहे. मुंबईतील कोरोनाबधितांची संख्या ही सध्या 30542 एवढी आहे. तर त्यापैकी 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र 988 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक : महाराष्ट्राच्या अजून एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण
सीमेवर कोरोना रोखणा-या सरपंच उपसरपंच पोलिस पाटलांचा प्रमाण पञ देवुन सन्मान
‘केंद्राकडून पॅकेज देण्यात आलेलं पॅकेज उघडलं, तर तो फक्त रिकामा खोका निघाला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
