🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ” काँग्रेसला त्यांची मतपेटी सांभाळायची आहे म्हणून घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्यास विरोध करीत आहेत! मा. मुख्यमंत्र्यांना विनंती आपण महाराष्ट्र धर्माचे रक्षण करा घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना काढून निर्वासित बौद्ध,जैन,ख्रिश्चन,हिंदूचे संरक्षण करा! असे ट्वीट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केले आहे.
काँग्रेसला त्यांची मतपेटी सांभाळायची आहे म्हणून घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना बाहेर काढण्यास विरोध करीत आहेत!
मा. मुख्यमंत्र्यांना विनंती आपण "महाराष्ट्र धर्माचे रक्षण करा" घुसखोर पाकिस्तानी, बांगलादेशींना काढून निर्वासित बौद्ध,जैन,ख्रिश्चन,हिंदूचे संरक्षण करा!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 14, 2019
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ”नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचे असेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देशहितासाठी हे विधेयक स्वीकारने आवश्यक आहे. शिवसेनेनं आपला मूळ बाणा दाखवावा, कोणाला घाबरू नये. असे म्हंटले आहेत.
तसेच ” सरकार वाचवण्यासाठी देशहित बाजूला ठेवू नका. नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी देशासाठी आवश्यक आहे. घुसखोरांना घालवलंच पाहिजे.” तसेच कॉंग्रेसच देशात भारत बचाव आंदोलनावर टीका करताना भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ही नौटंकी आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता, राष्ट्र सर्वप्रथम हा भाजपचा अजेंडा असल्याचा टोला आशिष शेलार यांनी काँग्रेसला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1205748230085955585?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1205752346254311424?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
