Share

काँग्रेसने एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही; काँग्रेसचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने जर्मनीला पराभुत करत तब्बल ४१ वर्षानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले. यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. क्रीडा क्षेत्रात केंद्र सरकारच्या नावाने दिला जाणारा पुरस्काराबद्दल त्यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रात देण्यात येणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलुन पंतप्रधान मोदी यांनी आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे.

यावरून आता राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारही देण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, काँग्रेससह विरोधकांनी मोदींच्या या निर्णयाला विरोध करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेसने एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही. ते म्हणजे बांगलादेश’ असे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस आणि विरोधक मोटेरा स्टेडियम वरून भाजपला धारेवर धरता आहे. अहमदाबादच्या नव्या स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवून एखाद्या खेळाडूचे नाव तिथे दिले जावे, अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!