मुंबई : कंगनाचे मुंबईबद्दल विधान चुकीचे आहे, त्याचा आम्ही विरोध करतो पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना राणौतनं मुंबईबद्दल जे विधान केले आहे ते आम्हा कोणालाच मान्य नाही. तिच्या वक्तव्याचा आम्ही निषेध केला. पण शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कंगनावर अर्वाच्च भाषेचा वापर केला. ही शिवसेनेची निराशा आहे. छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणे हा महाराजांचा अपमान आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
‘मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे अवमान करण्याऱ्या कंगना विरोधात पक्षभेद विसरून आवाज उठवा’
कंगना रनावत ने मुंबई पर जो टिप्पणी की,वह हम सबको अमान्य है।उसकी सबने निंदा की।
मगर शिवसेना ने छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेकर कंगना को हरामखोर कहा,यह शिवसेना की नीचता है।
उनके नाम पर सरेआम गाली-गलौज करना महाराज का अपमान है।
सरकार में बैठे लोगों को इस आचरण की निंदा करनी चाहिए।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 6, 2020
अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वादाची ठिणगी कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने पडली. यानंतर कंगना विरोधात शिवसेनेने आवाज उठवत तिला खडेबोल सुनावले होते.


