टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत देशातील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी काही बरे झाले असून त्यांना घरी देखील सोडण्यात आल आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाने आतापर्यंत राज्यातील कोरोना संधार्भातील आरोग्य अहवाल जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यात खालील बाबी दिलेल्या आहेत.
तपासणी केलेले एकूण नमुने – ३१५६
एकूण निगेटीव्ह प्रकारणे – २८६०
पाॅझीटीव्ह प्रकरणे – १२४
नमुना निकालांची प्रतीक्षा – १५०
अपूर्ण किंवा अस्वीकृत – २२
कोरोना पाॅझीटीव्ह मृत्यू – ४
* १ मृत्यू कोरोना पाॅझीटीव्ह उपचारानंतर निगेटीव्ह परंतु कोमॉरबीटीमुळे मृत्यू झाला.
उपचारानंतर कोरोना बरा झाल्यावर डिस्चार्ज दिलेले – १८
पुणे – ५
मुंबई – १२
औरंगाबाद (संभाजीनगर) – १
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली –
याबरोबरच,’सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे.’ असेही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.असही त्यांनी सांगितलं आहे.
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

