Share

राज्यावरचे संकट दूर करण्याची शक्ती दे, फडणवीसांची गणरायाकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: राज्यासह संपूर्ण देशात गणरायाचे आगमन मोठ्या जल्लोषात झाले आहे. त्यामुळे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘ गणेश पर्व अत्यंत आनंदाचं पर्व आहे. देशात -विदेशात हा सण आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण महाराष्ट्रात बाप्पाचा उत्साह वेगळाच असतो. गणरायाला एवढीच प्रर्थना की सर्वांना राज्यातील आणि देशातील जनतेला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना गणरायाकडे केली आहे.

तसेच पुढे बोलताना ‘महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याचा आणी पूर पिढीतांना दिलासा मिळावा यासाठी बाप्पाकडे प्रार्थना करतो, असं म्हणत बाप्पांचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे स्वतःसाठी काही मागण्याची वेळच आली नाही त्यामुळे देशातील जनता सुखी व्हावी हीच प्रार्थना आहे असं विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील काही ठिकाणावरील जनता पुरामुळे तर काही ठिकाणी दुष्काळामुळे त्रस्त आहे. त्यामुळे जनजीवन काही प्रमाणावर विस्कळीत झालेले आहे. त्यामुळेच राज्यातील जनता सुखी व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!