🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत?, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंडे यांनी आपल्या ट्विटवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे.
एकीकडे पुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात आहे. शहीद जवानांचे पार्थिव अद्याप त्यांच्या घरीही पोहोचलेले नाही. जनतेच्या भावना संतप्त आहेत आणि या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत? pic.twitter.com/PRnTm5fAEA
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 16, 2019
मुंडे यांनी केले ट्विट “एकीकडे पुलवामा घटनेमुळे संपूर्ण देश दुःखात आहे. शहीद जवानांचे पार्थिव अद्याप त्यांच्या घरीही पोहोचलेले नाही. जनतेच्या भावना संतप्त आहेत आणि या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर कार्यक्रमांचा, उदघाटनांचा सपाटा लावलाय. इतक्या यांच्या संवेदना कशा बोथट झाल्या आहेत?”


