Share

नागरिकांनी औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ असाच उल्लेख करावा-सुभाष देसाई

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शहराचे संभाजीनगर असे नामकरण केले आहे. त्यामुळे औरंगाबादचा शहरातील नागरिकांनी संभाजीनगर असाच उल्लेख केला पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. नामांतराचा प्रशासकीयस्तरावर प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.

शहरात झपाट्याने विकास कामे होत असून, देशात गाजलेला कचरा प्रश्न आता मार्गी लागला आहे. एक हजार ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा नारळ फुटला आहे. त्यामुळे लवकरच पाणीप्रश्न मार्गी लागेल. शहर स्मार्ट होत आहे. त्याला अधिक उंचीवर न्यायचे आहे. सुपर संभाजीनगर करायचे आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी झाले. पडेगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सुपर संभाजीनगर करायचे असे सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!