औरंंगाबाद : उन्हाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावरच शहराच्या विविध भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सिडको-हडको भागाला वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने या भागात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.
बुधवारी (दि.३) सिडको-हडकोत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
नवीन औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी जलाशय आणि जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव यंदाच्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे.
असे असतांना देखील मनपाकडून शहरासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे शहरातील अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सिडको-हडकोतील नवनाथनगर, मयूरपार्वâ, वानखेडेनगर, भारतमाता नगर या भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?
- उद्धव ठाकरेंना बाबरी बाबतचं ‘ते’ वक्तव्य भोवणार ? अबू आझमींनी दिला इशारा
- …अन् विरोधी पक्षनेत्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन !
- मैदानात बेन स्टोक्स आणि विराट एकमेकांना भिडले; वादएवढा वाढला कि अंपायर्सनी…
- ‘जय श्रीराम’ची एलर्जी असल्यानेच शिवसेनेचा ममता बॅनर्जींना पाठींबा; भाजप आमदाराची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

