Share

‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मर्जी सांभाळण्यात राऊतांचा घुंगरु सेठ झालाय’

Published On: 

मुंबई : राज्यात ऐन दिवाळीत सणामध्ये अहमदनगरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात आग दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून प्रतिक्रिया देताना दोन्ही सराकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘फक्त अश्रू ढाळू नका तर ठोस पावले काय उचलणार ते सांगा असा प्रश्न राउत यांनी दोन्ही सरकारला केला आहे’, असं राऊत म्हणाले. त्यांच्या या टीकेवर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

सर्वज्ञानी, अहमदनगरच्या आगीचं खापर पण केंद्रावर फोडत आहेत. व्हेंटिलेटर नव्हे तर राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनत चालली आहे. आगीत होरपळलेल्यांची चिंता संजय राऊतांना नाही. या उलट राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांची मर्जी सांभाळावी लागतेय उदय शेट्टी आणि मजनूमध्ये त्यांचा घुंगरु सेठ झाला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, नगरमध्ये आगीच्या दुर्घटनेचं निमित्त शॉकसर्किट असलं तरीही आरोग्य व्यवस्थेची ही होरपळ थांबायला हवी. अर्थातच सार्वजिनक आरोग्य व्यवस्था ही राज्य आणि केंद्र सरकार या दोघांची जबाबदारी आहे. सध्या मरणं सोपं झालंय, पण इतकं अमानुष आणि क्रूर असावं?, असा सवाल संजय राऊतांनी केला होता. त्यावरुनच चित्रा वाघ यांनी राऊतांचा घुंगरु सेठ झाल्याचं म्हंटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!