Share

नाराज सिद्धुंचे मन वळविण्यात मुख्यमंत्र्यांचे यश

Published On: 

पंजाब: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दलित उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांची निवड केली. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नाराज सिद्धुंचे मन वळविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर सोपवली गेली होती. आणि त्यांनी ती चोख बजावली आहे.

सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर मुख्यमंत्री चन्नी आणि सिद्धू यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सिद्धू यांचे मन वळविण्यात यश आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि सिद्धू यांनी सर्व काही सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान नवज्योतसिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची भेट घेतली. तर त्यातच दुसरीकडे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह आणि एनएसए अजित डोभाल यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना अजूनच उधान आले. तर यावरूनच अकाली दलाने काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, पक्षाने राज्यात रबर स्टॅम्प सीएम केले आहे. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही सामना अग्रलेखातून कॉंग्रेसची अवस्था स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!