Share

मुख्यमंत्री ठाकरेंनी पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तत्काळ मदत करावी-विनायक मेटे

Published On: 

🕒 1 min read

बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सॅटेलाइटद्वारे उपलब्ध असलेल्या नुकसानीच्या माहितीआधारे तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, उडदाचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण अडचणीत आलेला असून शेतीचे नुकसान झाले आहे. आता साधारणतः चार ते पाच वर्षे तरी जमीन व्यवस्थित होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी, असे आवाहन आमदार मेटे यांनी केले आहे.

यावर्षी सातत्याने पूर, अतिवृष्टीमुळे राज्यात ४३६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तत्काळ मदतीची घोषणा करायला हवी, शासनाकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा सॅटेलाइट डाटा उपलब्ध आहे. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात यावी. कारण मागील वेळी पंचनामे केलेली रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ कागदी घोडे नाचवण्यात काहीही अर्थ नाही, असे आमदार मेटे यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!