🕒 1 min read
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस नकार दिला आहे. या संदर्भातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर लवकरच ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्यासाठी तेजस्वी यादव यांनी आग्रह धरला होता. यासाठी नितीशकुमार, तेजस्वी यादव यांच्यासह बिहारमधील नेत्यांनी मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दरम्यान ‘जातनिहाय सर्वेक्षण’ जन हिताचे असून त्यासाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही तेजस्वी यादव यांनी केली आहे.
दरम्यान बिहारमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांचे सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे नितीशकुमार यांनी म्हटले आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यादव यांचीही उपस्थिती होती.
महत्वाच्या बातम्या:
- विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का?; संजय राऊतांचा सवाल
- “…तरीही जम्मू-काश्मीर अशांतच का?”, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
- KK चे क्रिकेटवरील प्रेम! गायले होते १९९९ च्या क्रिकेट विश्वचषकाचे थीम साँग; पाहा VIDEO!
- मेहंदीच्या कार्यक्रमात दीपक चाहर अन् जया भारद्वाजचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल!
- गांगुलीचा अध्यक्षपदाचा राजीनाम्याबाबत सचिव जय शहांच मोठं वक्तव्य; म्हणाले, “सौरवने अध्यक्षपदाचा…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
