Share

Chhagan Bhujbal | “उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी वाद उकरून काढू नये”; छगन भुजबळांचा राज्यपालांना सल्ला

Published On: 

नाशिक : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेलं आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे. कोश्यारी म्हणाले कि, महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, अस वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील अनके बडे नेते प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया देत राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

छगन भुजबळ एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले कि, “राज्यपालांनी असं विधान करून उगाचंच गुजराती, राजस्थानी आणि मराठी माणसातील वाद उकरून काढण्याचे काही कारण नाही. राज्यपालांनी मुंबईचा इतिहास समजून घेतला पाहिजे, मुंबई ही मूळ आगरी, कोळी समाजाची आहे. पोर्तुगीज, इंग्रज आणि कालांतराने आलेल्या पारशी समाजालाही मुंबईचे महत्व माहित होते. गुजराती आणि राजस्थानी सामाज उदयोग धंद्यांसाठी मुंबईत आला. परंतु त्यामुळे मुंबईतील मराठी माणसाचे कष्ट विसरून कसे चालेल”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“मुंबईचे वातावरण पोषक आहे. तसेच इथे बॉलीवूड सुद्धा आहे. मग बॉलीवूडमध्ये काय फक्त गुजराती आणि राजस्थानी सामाजातील लोक आहेत?, तिथे तर पूर्ण भारतभरातून लोक येतात. मुंबईला वीज-पाणी हे सुद्धा महाराष्ट्रातील इतर जिल्हे पुरवतात. मग जर ते पुरवलंच नाही तर कसं होणार?, मुंबईचे आकर्षण हे सगळ्यांनाच आहे. मात्र राज्यपालांनी असं काही बोलणं योग्य नाही. जनतेच्या भावना दुखावल्या जातील किंवा कुणाला डिवचण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी करू नये”, असा सल्लाही भुजबळांनी राज्यपालांना दिला.

जयंत पाटलांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात ट्विट करत लिहले आहे कि, “घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जपून बोलण्याचा संकेत देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे. परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे.”, असा खोचक सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!