Share

Chandrashekhar Bawankule | “आगामी काळात राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाहीत”; बावनकुळेंची बोचरी टीका

Published On: 

🕒 1 min read

Chandrashekhar Bawankule | पुणे : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच दुसरीकडे सत्ताधारी पक्षांवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीयेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युट येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय.

बावनकुळे म्हणाले, की बारामतीत दहशतीचे वातावरण आहे. गेल्या ४० वर्षांसापासून एकाच घरात सत्ता आहे. त्यामुळे तेथील लोक बाहेर बैठकीत येण्यासही घाबरतात. राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे.

तसेच आव्हाड यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ज्या कारणासाठी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याच्या कृतीचे समर्थन करून बोलणाऱ्यांचे नाव गुन्ह्यात सहभागी करण्याची मागणी आहे. राज्य सरकारने संवेदनशील मार्गाने गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी सांगितलं. महविकास आघाडी सरकारने केंद्राच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहचू दिल्या नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केलाय.

पुढे ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही. हा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत कोणी टिकत नाही. आगामी काळात राष्ट्रवादीकडे उमेदवारही राहणार नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!