🕒 1 min read
औरंगाबाद : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशामध्ये हिंदूची मंदिरे, धार्मिक स्थळे इतकेच नाही तर आता हिंदूच्या घरावरही हल्ले होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संबंधीत केंद्र सरकारच्या वतीने ठोस पावले टाकणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले आहे.
बांगालादेशामध्ये हिंदू समाजाच्या मंदिरावर आधी हल्ला करण्यात आला होता. त्या नंतर या हल्ल्यांची मालिका सातत्याने सुरू आहे. कथिथ क्लिप संदर्भात होत असलेल्या या हल्ल्यामुळे तिथल्या हिंदू समूदायाकडून जोरदार निर्दशने करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनेही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.
आता तर हद्दच झाली! बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हिंदुस्थानातील केंद्र सरकारने ठोस पाऊल टाकणे नितांत आवश्यक आहे. https://t.co/YC1HqtVFJd
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 19, 2021
बांगलादेशमधील ६० पेक्षा जास्त हिंदूंची घरे जाळण्यात आली असल्याचा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले की, ‘आता तर हद्दच झाली! बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी हिंदुस्थानातील केंद्र सरकारने ठोस पाऊल टाकणे नितांत आवश्यक आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
