अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाची निवडणुक झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी येत्या गुरूवारी (दि.१ ऑक्टोबर) रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. पण त्याआधीच शिवसेनेत स्विकृत नगरसेवक निवडीवरुन पुन्हा रणकंद सुरू झाले आहे. अनिलभैय्यांनी आजपर्यंत कधीच जातीचे राजकारण केले नाही, पण आता अहमदनगर शहरात जातीचे राजकारण सुरु झाले आहे. आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल. अशी भीती व्यक्त करणार पत्र अहमदनगरमधील शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगरमध्ये येत्या गुरुवारी स्विकृत नगरसेवक भरणार आहे. आजपर्यंत दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही म्हणूनच शिवसेना बळकट राहिली. परंतु काही दिवसांपासून पक्षात जातीचे राजकारण होत असून, राठोड यांनाही त्याच जातीच्या राजकारणाने पराभूत केले होते. आजही स्विकृत नगरसेवक भरतीच्या वेळी जातीचे राजकारण करून दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. तरी आपण याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती शेळके यांनी पत्रात केली आहे.
महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदासाठी पाच जागांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ व भाजपचा १ असे वाटप आहे. आता प्रत्येक पक्षाचे गटनेते आपल्या संख्याबळानुसार सदस्यांच्या नावांची शिफारस करतील. त्यामुळे या पदासाठी इच्छुकांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शहरात शिवसेनेची घडी बसविण्यासाठी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख प्रयत्न करीत आहेत. मागील ३० वर्षांपासून स्व.अनिल राठोड यांनी अहमदनगरमध्ये शिवसेना जिवंत ठेवली. परंतु त्यांच्या निधनानंतर मंत्री गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत गडाख यांनी माघार घेतल्यामुळे शहरातील कट्टर शिवसैनिक नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचाच उद्रेक आज शेळके यांनी पाठविलेल्या पत्राच्या रुपाने दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुश्रीफ साहेब थोडे लक्ष नगर जिल्ह्याकडेही द्या; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ७९० नवे बाधित
- नेवासे तालुक्यातील मुळा सहकारी सुतगिरणीच्या प्रस्तावास वस्त्रोद्योग विभागाची मान्यता – शंकरराव गडाख
- बाबरी विध्वंस प्रकरणी निकाल वाचण्यास सुरुवात; अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह इतर आरोपींची मुक्तता की कारावास?
- मराठवाड्यातील अतिवृष्टीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- ‘चंद्रकांत पाटील म्हणतात पुन्हा पहाटे भूकंप होणार, त्यांनी काय गजर लावला आहे का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

