Share

‘या’ पराभवनानंतर कर्णधार विराटची हताश शब्दात प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‌ॅडिलेड ओव्हल येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येत आहे. या सामन्याचा आजचा तिसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भाराताची अवस्था अत्यंत बिकट केली. अवघ्या 15 धावात भारताचा अर्धा संघ तंबूत धाडलाच, शिवाय अवघ्या ३६ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. मात्र अखेरचा फलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने तो फलंदाजी करू शकला नसल्याने ३९ धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला. जोश हेझलवूडने घातक गोलंदाजी करत ८ धावा देत ५ फलंदाजांना तंबूत धाडलं. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली.

“हा पराभव खूप जिव्हारी लागण्यासारखा आहे, कदाचीत शब्दांत मांडता येणार नाही. आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती आणि त्यानंतर सगळा डाव कोलमडला. दोन दिवस तुम्ही मेहनत करुन सामन्यात आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवता पण एका तासाच्या खेळात चित्र असं काही बदलून गेलं की तिकडून सामना जिंकणं आमच्यासाठी केवळ अशक्य झालं. आम्ही विजयाच्या भावनेने खेळलोच नाही. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच मारा करत होते, पण आमचे फलंदाज फक्त धावा कशा जमवता येतील याचा विचार करत होते.”

गोलंदाजांनी काही विशेष कामगिरी केली असं मला वाटत नाही, पण धावा जमवणं कठीण वाटत होतं. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी घेतला, अशा शब्दांमध्ये विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो मायदेशी परतणार आहे.  विराटच्या गैरहजेरीमध्ये अजिंक्य रहाणे उरलेल्या तीन मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!