🕒 1 min read
औरंगाबाद :शहर अभियंता सखाराम पानझडे यांना देण्यात आलेली नियुक्ती बेकायदेशीर असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी औरंगाबाद सफाई कामगार संघटनेतर्फे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय(Astik Kumar Pandey) यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, तत्कालीन शहर अभियंता हे महानगरपालिकेतुन वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने शहर अभियंता या पदावर शासनाकडुन प्रतिनियुक्ती अधिकारी देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी हर्सूल तलावातील गाळ काढण्याच्या कामात पानझडे यांचे निलंबन केले होते. त्यांच्याविरूध्द विभागीय चौकशीही सुरू होती. आता पुन्हा एकदा त्यांना नियुक्ती देतांना शासन निर्णयातील निकषाचे पालन केलेले नाही. सेवानिवृत्त अधिकारी यांना देण्यात आलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे.
कारण शासन निर्णयामधील अ.क्र. १५ चा प्रथम भंग केलेला आहे. तसेच प्रशासनाने भ्रष्ट अधिकारी यांना सेवानिवृत्ती नंतर पुन्हा नियुक्ती देण्याअगोदर शासनाशी पत्र व्यवहार करून शहर अभियंता या पदावर प्रतिनियुक्तीवर शासनातर्फे अधिकारी मागविणे आवश्यक होते. किंवा मनपातील कार्यरत अधिकारी यांना पदोन्नती देणे आवश्यक आहे. परंतु प्रशासनास सखाराम पानझडे यांचा पुळका का आला? हे समजले नाही. तसेच कोणत्या कामासाठी त्यांना पुन्हा सेवेत घेतले याचा बोध होत नाही. सखाराम पानझडे हे सेवानिवृत्त झाल्यावर दिलेली बेकायदेशीर नियुक्ती रद्द करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सफाई कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद मोईनोददीन इनामदार यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला वेग; 174 संपकऱ्यांना केलं बडतर्फ
- राज्यात लावलेल्या नव्या निर्बंधानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना
- कालीचरण महाराजांना महात्मा गांधींबाबत केलेलं वक्तव्य भोवलं; एफआयआर दाखल
- विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका; नाना पटोलेंचा आरोप
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार


