Share

Ajit Pawar । मंत्रिमंडळ विस्तार करायला सरकार कशाला घाबरत आहे?; अजित पवार आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar। मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केली जात होती. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार राखडलेलाच आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून वारंवार सरकारला जाब विचारत आहेत.

अजित पवार म्हणाले कि, लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली पाहिजे. राज्य सरकारने ताबडतोब अधिवेशन बोलावलं पाहिजे. पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यात होतं. पण जुलै झाला. ऑगस्ट आला. तरीही यांना मुहूर्त मिळेना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठला ग्रीन सिग्नल मिळेना की त्यांच्यात एक वाक्यता होईना? मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत हे कळायला मार्ग नाही?, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आज आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता सोमवारनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आता यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्यास विलंब झाला आहे. तसेच आतापर्यत शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केलं होत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!