नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.
आरोग्य क्षेत्राला अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार झुकते माप देताना दिसत असून आजार रोखणं हे सरकारसमोरचं सर्वात मोठं लक्ष्य आहे असे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना सांगितले आहे.
देशात 15 आरोग्य आपत्कालीन केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. सरकारने कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा अर्थसंकल्प संकटातील संधीप्रमाणे आहे असे देखील त्या म्हणाल्या.
आज भारताकडे दोन करोना लस उपलब्ध असून फक्त आपल्याच नाही तर अनेक देशातील नागरिकांची करोनाविरोधात सुरक्षा केली जात आहे. आणखी दोन लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली असून १५ अत्यावश्यक आरोग्य केंद्रं आणि दोन मोबाईल हॉस्पिटल्सची घोषणा करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- #Budget2021 : अर्थसंकल्प सादर होण्याआधी राहुल गांधींनी ट्वीट करून केली ‘ही’ मागणी
- #Budget2021 : मध्यमवर्गीय,बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा बजेटमधून पूर्ण होणार का?
- #Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता
- #Budget2021 : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हिताचं बजेट असावं : संजय राऊत
- #Budget2021 : शेतकऱ्यांच्या तसेच मध्यमवर्गाच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

