🕒 1 min read
Gujrat | गांधीनगर : गुजरात (Gujrat) येथील राजकोटमधील मोरबी (Morbi) भागात पूल कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेट (Gujrat Accident) तब्बल १२० जणांच्या मृत्यूचा आकडा समोर आला आहे. तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. एवढंच नाही तर मृत्यूंचा अकडा वाढण्याची देखील शक्यता आहे.
हा पूल सुमारे 7 महिन्यांपासून बंद होता. केबल ब्रिज बराच जुना असून नूतनीकरणानंतर केवळ 5 दिवसांपूर्वीच तो कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात येत आहे. नूतनीकरणानंतरही एवढा मोठा अपघात घडल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुलावर उभे असलेले शेकडो लोक मच्छू नदीत पडले. मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी दुर्घटनेत आतापर्यंत 120 जणांचा मृत्यू झाला
आहे. यात महिला, लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश आहे. या अपघातात 177 जणांना वाचवण्यात यश आलं असून 19 जखमींवर मोरबी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील आपला रोड शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs SA । केएल राहुल पुन्हा एकदा ठरला फ्लॉप, फॅन्सने सोशल मीडियावर केलं ट्रोल
- IND vs SA । दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 5 गडी राखून विजय
- Bachhu Kadu । नाव बच्चू असंल तरी आडनाव कडू आहे हे लक्षात घ्या; बच्चू कडूंचा इशारा
- T-20 World Cup । टी 20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नावावर आणखीन एक मोठं रेकॉर्ड
- IND vs SA । सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
