Share

‘दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही, त्यांच्या समर्थकांनी नेत्यांकडे विचारणा करावी’

Published On: 

🕒 1 min read

पिंपरी-चिंचवड : दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ नेत्यांना स्थान मिळाले आहे. १ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रिपद महाराष्ट्राच्या पारड्यात पडले आहे. नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर, अनेक दिग्गज नावे या स्पर्धेत होती. प्रीतम मुंडे, उदयनराजे भोसले, हिना गावित यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशा चर्चा होत्या.

दरम्यान, भाजपच्या निष्ठावंताना डावलण्यात आल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तर, सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मराठा समाजाची भूमिका मांडणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांना मंत्री न केल्याने त्यांच्या समर्थकांनी नेत्यांना जाब विचारावा असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

‘दोन्ही छत्रपतींना मंत्रिमंडळात घेतले नाही. याबाबत त्यांच्या समर्थकांनी विचारणा करावी,’ असं संजय राऊत म्हणाले. यासोबतच, ‘पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचे काम सुरु असल्याची चर्चा सुरु आहे,’ असा पुनरुच्चार देखील संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!